मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना : नमस्कार शेतकरी बंधूंनो, कोरोना काळात निधीची अडचण असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना (Farm Pond Scheme) बंद झाली होती. आता ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे (Personal Farm Pond) येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

आधी जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळायचे ते आता जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शिवाय जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana
राज्यातील दुष्काळी भागात उन्हाळ्यात अथवा टंचाईच्या काळात कमी पाण्यात पीक घेता यावे, उभी असलेली पीक जगवता यावीत यासाठी कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवली जाऊन या योजनेतून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे करण्यासाठी अनुदान दिले जात. या योजनेतून राज्यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शेततळे झाली आणि त्याचा दुष्काळाच्या काळात फायदाही झाला. कोरोना काळात निधीची अडचण निर्माण झाल्याने २०२० पासून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना बंद केली होती.
सोमवारी (ता. ७ नोव्हेंबर) मार्गदर्शक सूचना जाहीर करत राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आदेशित केले आहे. ही योजना आता ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’ या नावे राबवली जाणार आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १०१०, अनुसूचित जमातीसाठी ७७०, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ११ हजार ७२० लक्ष्यांक आहे.
मागील योजनेसारखेच अनुदान या योजनेत मिळणार असले तरी अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. लाभार्थ्यांना MahaDBT ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील. लाभासाठी किमान साठ गुंठे जमीन आवश्यक असून, यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना जिल्हानिहाय शेततळ्याचे उद्दिष्ट
ठाणे ः १२५, पालघर ः १२०, रायगड ः २१०, रत्नागिरी ः २१०, सिंधुदुर्ग ः १९०, नाशिक ः ६०५, धुळे ः २६०, नंदुरबार ः १६५, जळगाव ः ५९०, नगर ः ९३०, पुणे ः ६००, सोलापुर ः ६९० सातारा ः ६००, सांगली ः ४७५, कोल्हापुर ः ४८०, औरंगाबाद ः ६४०, जालना ः ४७०, बीड ः ६३०, लातुर ः ३९५, उस्मानाबाद ः ३९०, नांदेड ः ५७०, परभणी ः ४२०, हिंगोली ः २८०, बुलडाणा ः ५००, अकोला ः ३४०, वाशीम ः २५५, अमरावती ः ५००, यवतमाळ ः ५००, वर्धा ः २२०, नागपूर ः ३२५, भंडारा ः १८०, गोंदिया ः १८५, चंद्रपूर ः ३१०, गडचिरोली ः १४०. Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana
Mukhyamantri Shasvat Sinchan Yojana योजनेचा अचूक अर्ज कसा करावा : लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन योजनेचा अचूक अर्ज करून त्याची पोच पावती घ्यावी. अधिक महितीकरिता तुमच्या तालुक्यातील कृषी विभागात संपर्क करावा.